
Written by
नितेश शेंडे
प्रतिनिधी, नितेश शेंडे


प्रतिनिधी, नितेश शेंडे
आवाळपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बिबी येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गावातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील सुमारे १३० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे आयोजन सोशल लाईट ऑर्गनायझेशन, आवाळपूर यांच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळावी व त्यांना आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वह्या, पेन, पेन्सिल आदी साहित्याचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान शिव, फुले, शाहू व आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विचार परिसंवाद आयोजित करण्यात आला. सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व आणि न्याय यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उपस्थितांना प्रेरणादायी संदेश देण्यात आला.वोट करें
