
Written by
लोकविजन न्युज
प्रतिनिधी, नितेश शेंडे


प्रतिनिधी, नितेश शेंडे
आवाळपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बिबी येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गावातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील सुमारे १३० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे आयोजन सोशल लाईट ऑर्गनायझेशन, आवाळपूर यांच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळावी व त्यांना आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वह्या, पेन, पेन्सिल आदी साहित्याचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान शिव, फुले, शाहू व आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विचार परिसंवाद आयोजित करण्यात आला. सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व आणि न्याय यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उपस्थितांना प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
वोट करें
No polls available.
समय, विश्वास और सम्मान, ये ऐसे पक्षी हैं जो एक बार उड़ जाएं तो वापस नहीं आते। इसलिए इनकी कीमत समझें और इन्हें कभी न खोएं, क्योंकि इन्हें दोबारा हासिल करना लगभग असंभव होता है।
